BLOGGER TEMPLATES AND TWITTER BACKGROUNDS

Friday, August 4, 2017

सहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...



सहस्रचन्द्रदर्शनमधे मी ताईची भूमिका करते. ह्या नाटकांत मला जरी फार आव्हानात्मक भूमिका नसली, तरी नाटकाची कथा, त्यातली पात्रं आणि त्यातले कलाकार, ह्यामुळे मला मजा येणार हे माहित होतं. ह्या नाटकाची process करताना मला स्वत:मधल्या अनेक गोष्टींचा पुन्हा प्रत्यय आला.

नाटकाच्या तालमी सुरु झाल्या तेंव्हा प्रदीप म्हणाला की आपण लगेच script वर काम सुरु न करता आधी त्या सर्वं पात्रांच्या आयुष्याबद्दलच्या आणि त्यांच्या एकेमेकांशी असलेल्या नात्यांबद्दलच्या back stories ची improvisations करणार आहोत.

पहिल्या एक-दोन improvisations च्या वेळेची ही आठवण. एक improvisation चालू असताना अचानक मला समजलं की माझा डोक्याने थोडा अधू भाचा गणा, म्हणजे गणेश, माझ्या मुलीला एकदा रात्री काहीतरी odd मिठी मारतो. मी इतकी प्रचंड संतापले ! संतापाने मला जे रडू आलं ते नंतर त्या improvisation बद्दलची चर्चा संपली तरी आवरंत नव्हतं. त्या वेळी सचिन ने गणा ची भूमिका केली होती. मला कितीतरी वेळ त्याच्याकडे बघता सुद्धा येत नव्हतं. एकीकडे हे समजत होतं की सचिन आणि गणा वेगळे आहेत, पण तरी त्या दिवशी त्यानंतर मला त्याच्याकडे रागाशिवाय इतर कुठल्या भावनेने पहाताच येत नव्हतं.

त्यानंतर अनेक दिवसांनी एका improvisation मधे एक गडी माझ्या मुलीला, श्वेताला, ती लहान असताना भुताची गोष्टं सांगून घाबरवतो. ती खूप रडते. हे सगळं wing मधे होतं आणि मी चिडून घरात येते अशी माझी entry होती. तरी मला इतका राग आला होता की शांत व्हायला जरा वेळंच लागला.

माझ्या लोकांना अगदी इतकासा सुद्धा त्रास कोणी दिला कि मी disproportionately चवताळते ह्याचा प्रत्यय मलाच नाही तर माझ्या सहकलाकारांनाही आला :)

- रुपाली भावे (सहस्रचंद्रदर्शन मधली ''ताई'')

Sunday, July 12, 2009


तुम्ही हे नाटक पाहिलंत का ?

तुमची प्रतिक्रिया इथेच खाली comments मधे लिहा ....

नवीन प्रतिभा आणि improvisation


सहस्र.... च्या नुकत्याच झालेल्या प्रयोगांसाठी भाग्यश्री ला प्रतिभा म्हणून आम्ही तालीम देत होतो .. नवीन प्रतिभाला तिची भूमिका समजणं सोपं व्हावं म्हणून तेव्हा प्रदीप ने काही improvisations घेतली.

त्यातल्या एका improvisation ची पार्श्वभूमी त्याने अशी दिली की तुम्ही कोकणात आलात त्या दिवशी जे भांडण झालं आणि त्यातनं आई आजारी पडली, त्या रात्री आई ICU मध्ये आहे आणि तू आणि प्रतिभा बाहेर बसलायत. Doctor त्यांची शेवटची round घेऊन येतात आणि तुम्हाला सांगतात की आई चं काहीही सांगता येत नाही. २४ तासात काही सुधारणा झाली तरंच आशा आहे आणि ते जातात. इथून improvisation ला सुरुवात होते. हेच improvisation मी आधीच्या एका प्रतिभा बरोबर सुद्धा केलं होतं. पण दोन्ही improvisations पुढे इतकी वेगळी झाली ! एकंच गोष्ट समान होती. ती म्हणजे मला झालेला त्रास. मी इतकी हलले दोन्ही वेळी ! विचारांची आणि भावनांची इतकी गर्दी झाली मनात !

जेंव्हा प्रदीप ने background brief दिलं, तेंव्हा माझ्या मनात आलं होतं की 'अरे हे तर आपण आधी एकदा केलं आहे, आज परत जमेल का ?' पण मी काही बोलले नाही. फक्त नव्याने त्या सर्व गोष्टीवर विश्वास ठेवला. पूर्णपणे surrender केलं प्रत्येक क्षणाला. आणि मजा म्हणजे पुन्हा एकदा ते सर्व मला तितक्याच उत्कटतेने जगता आलं ! मला इतकं आश्चर्य वाटलं.

खरंच ! आपलं मन म्हणजे एक अद्भुत रसायन आहे ! :)


Friday, July 10, 2009

Pratibha aatya no ONE (Prajakta) Says ....


swatacha shodh ghene he kadhi kadhi khup garajeche houn basate. khupda apan dukhrya jaagi malampatti karato pan mool jakhamevar kadhi upchar karat nahi. dukhel khupel ya bhitine haat laau det nahi kunala. mag apan visarun jaato soyiskar ki ashi jakham hoti kadhi mhanun. sahasra karayla suruvat kelynantar pahile kahi divas mala khup traas jhala ya sagalyacha. me pradeep la mhanat hi ase ki tu mala roj radavto mhanun. pan nantar malach ase janavale ki me ch radayche taalat aale hote. ya natakane mala kay nahi dile? pahilyanda stage var ubhe rahaycha confidence tar dilach pan swatacha shodh ghyaychi takad dilli. me kokanat vadhale ahe pan te khup lahanpani tyamule mala tyachyashi relate karata yeil he thode avghadch hote. ata tar me pakki shahrich ahe. tyamule anjarlyachi trip ha khup motha dua hoti majhyat and natakachyat. aaj hi me shanta pratibha scene cha jevha vichar karate tevha mala aujnhi tyat kahi sapadat rahate. mahit nahi he natak majhysathi cathrsis hote, me koradi hot chalale hote tevha mala halavnare hote ki naati astat he sanganyasathi majhya ayushyat aale hote. je kahi hote te khup majhe hote ani tyach barobar sagalya dikshit kutumbache hi hote. aaj suddha kadhitari me ekhadya veli patkan emotional nahi hot ani mag me swatch mhanate, " barobar he agdi pratibhasarakhi wagteyas tu" aaj suddha kahi naati mala majhya ayushyat navyane sapadat ahet ani to anand ghyaychi takad mala faqt sahasra ne dili ahe.

pradeep tu evadhi mothi marathit type karaychi process sangun me shevati ingraji marathitch lihite ahe. kadachit me na aikleli hi ekmev "process" asel. :)))

and now this for my sweetheart deepa,
bhaau you should be proud that deepa writes to me in beautiful english now. next time when i come to India i will get her some storybooks. deepa, you can read them to bhaau and help him understand the stories also

love

Pratibha aatya (Prajakta)

Monday, June 29, 2009

प्रतिक्रिया

तुम्ही हे नाटक पाहिलंत का ?

तुमची प्रतिक्रिया इथेच खाली comments मधे लिहा ....


Sunday, June 28, 2009

काही छायाचित्रं !









Friday, June 26, 2009

भाऊ म्हणतो ....

मी निखिल मुजुमदार. "सहस्रचंद्रदर्शन....." ह्या नाटकात "भाऊ......" ही भूमिका करतो. पहिल्या दिवशी जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला ते फार आवडलं नाही. ह्यात काहीच घडत नाही असं मला वाटलं. खूप हळू-हळू गोष्टी घडत जातात. आपण जगतो तसं हे नाटक घडतं. त्यामुळे ते किती परिणामकारक होईल याबद्दल मला शंका होती. परंतू जेव्हा प्रोसेस सुरु झाली तेव्हा ते फार इंटरेस्टिंग होत गेलं...


आमच्यापैकी बऱ्याच लोकांनी कोकण पाहिलं नव्हतं. मी ह्या बाबतीत फारच मागे होतो. मला साधी करवंद सुद्धा माहिती नव्हती. म्हणून आम्ही सगळे कोकणातील "आंजर्ले..." येथे जाऊन काही दिवस राहिलो. फार छान अनुभव होता तो. मी पूर्णपणे शहरात वाढलेला होतो. मला खेडेगाव हे काय असतं हे माहितीच नव्हतं. नाटकात मी जी भूमिका करतो आहे ती एका कोकणातल्या शेतकऱ्याची आहे. मी शेत, आंब्याची बाग ह्या गोष्टी कधी पहिल्याच नव्हत्या. चुलीवर स्वयंपाक करणे म्हणजे नक्की काय हे सुद्धा माहित नव्हतं. पण जेव्हा मी आंजर्ल्याला गेलो तेव्हा फार वेगळं वाटलं. समुद्र, कड्यावरचा गणपती, गावातला पीर, तीथे राहणारे लोक हे सगळं खूप छान, वेगळं आणि आमच्या नाटकाला पूरक असं होतं.


ह्या नाटकाच्या प्रोसेसचा भाग म्हणून आम्हाला सगळ्यांना काही वास, रंग, फूल, चव लक्षात ठेवायला सांगितलं. त्याप्रमाणे मी झेन्डूचं फूल, राखेचा रंग, काजळीचा वास आणि कुळथाच्या पिठल्याची चव ह्या गोष्टी लक्षात ठेवून, मनात साठवून पुण्यात परत आलो...

आम्ही हे नाटक उभं करण्यासाठी खूप कष्ट घेतले. खूप तालमी केल्या. मला मात्र शेवटपर्यंत "भाऊ...." हा जमत नव्हता. कुठेतरी काहीतरी कमी होतं. मला अजिबात confident वाटत नव्हतं. आमचा ११ डिसेंबर ला पहिला प्रयोग होता. ९ डिसेंबर ला आमची रंगीत तालीम होती. त्यादिवशी तालीम करत असताना काय झालं माहित नाही पण भांडणाचा सीन चालू असताना मला रडू आलं. तो interval च्या आधीचा सीन होता. तो सीन झाला, पडदा पडला आणि संयोगिता( दीपा , माझी नाटकातली मुलगी) मला मिठी मारून रडायला लागली. मला काहीच कळत नव्हतं. सगळे शांत होते. कोणीच कोणाशी ५ मिनिटे बोलू शकलं नाही. आणि नंतर प्रदीपदादा फक्त दुरून माझ्याकडे बघून हसला.......... त्यादिवशी मी पहिल्यांदा स्टेजवर "निखिल" म्हणून नाही तर "भाऊ...." म्हणून उभा होतो. प्रयोगाच्या २ दिवस आधी मला actor म्हणून मिळालेला हा breakthrough खूप महत्वाचा होता.


मला अजूनही तो दिवस आठवतो ज्या दिवशी आम्हाला आमचा राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल कळला. त्या दिवशी निकाल लागणार आहे हे आम्हाला माहिती होतं. प्रयोगसुद्धा चांगला झाला होता. पण तरी मनात धाकधूक होती. प्रदीपदादाला निकाल दुपारीच कळला होतं पण त्याने दुपारी कोणालाही सांगितला नाही. आम्ही सगळे संध्याकाळी भेटलो. नेहेमीप्रमाणे गोलात बसलो. पहिली २ - ४ वाक्य दादा वेगळंच काहीतरी बोलला. आणि एकदम त्याने आम्हाला पहिल बक्षीस मिळालं असं सांगितलं. सगळे साधारण २ - ३ सेकंद शांत बसले. आणि मग एकदम सगळ्यांनी एकंच गोंधळ सुरु केला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ४ वर्षांची प्रतीक्षा संपली होती. ४ वर्षं आम्ही एकत्र नाटक करण्याची ! आम्ही खूप धडपड, खूप अडचणींवर मात करून हे नाटक केलं होतं. त्या मेहेनतीचं चीज झालं होतं. आम्ही खुश होतो. खूप खुश होतो.........आहोत...........राहू...............एकमेकांबरोबर...............


नाटकाची प्रोसेस सुरु असताना आम्ही सगळे एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो. आम्ही बऱ्याच गोष्टी एकमेकांशी शेअर करू लागलो. ह्या नाटकाने मला साधारण १५ खूप चांगले मित्र - मैत्रिणी दिले. आजही आम्ही एकमेकांवर तेवढंच प्रेम करतो जेवढं आम्ही नाटकाची प्रोसेस चालू असताना करत होतो. आम्ही भेटलो नाही तरी एकमेकांबरोबर कायम असतो.


ह्या नाटकामुळे आम्ही आयुष्यात माणूस म्हणून घडत गेलो. आम्हाला सगळ्यांना ह्या नाटकाचा आमच्या आयुष्यात खूप फायदा झाला. माझा अभ्यास सुधारला. चांगले मार्क्स मिळाले. हे नाटक चालू असताना मी २ companies मध्ये select झालो. मला Australia ला जायची संधी मिळाली. हे सगळं "सहस्र....." ने मला दिलं.


माझ्या आयुष्यातल्या काही खूप महत्वाच्या गोष्टींपैकी "सहस्र........" ही एक गोष्ट आहे. मी हे सगळं कधीच विसरू शकणार नाही. कधीच नाही.......

अगबाई !!!!!!!! मी वसुधा




अगबाई !!!!!!!!


मी वसुधा. म्हणजे सौ वसुधा सुधाकर दीक्षित.:-)


अंतर्बाह्य कोकणातली! दीक्षितांच्या माजघरामधली मायेची ऊब. सारवलेलं घर, वेखंडाचा सुगंध, जात्याची घरघर, कुळथाचं पिठलं! या साऱ्या संवेदनांचं लेण ल्यालेली ! परक्या घरातून आलेली. पण कोणाला हे सांगूनही पटणार नाही इतकी या दीक्षितांच्या घराशी एकरूप झालेली............ सगळ्यांशी मुळी मायेने वागावं असंच वाटतं मला......वाईट मेलं कशाला वागायचं आणि ?????


''सहस्रचंद्रदर्शन'' हे नाटक लिहिण्याच्या साधारण एक वर्ष आधी, एकदा प्रदीपदादाने मला विचारलन की, कोकणातल्या घरांवर ती काचेची दोन कौलं असतात, त्यातून कवडसा आत येतो तर, त्याला नेमका काय शब्द आहे? ते जरा आजीला विचारून सांग.


मी घरी विचारलं तर त्याला ''झरोका'' म्हणतात असं सगळ्यांनीच सांगितलं. प्रदीपदादालाही हाच शब्द माहित होता. मी विचारलं , का रे? एकदम झरोका वगैरे? तर दादा म्हणाला,एक नाटक लिहितोय. कोकणाच्या पार्श्वभूमीवर आहे. कौटुंबिक आहे. नाटकाचं नाव आहे, ''सहस्रचंद्रदर्शन'' !



वा वा! अप्रतीम! सगळ्याच गोष्टी मनाला भावणाऱ्या! मी खुश झाले. मग हळूहळू नाटक लिहून पूर्ण झालं . नाटकच वाचन झालं . वसुधाचा रोल मी करायचाय असा दादाने सांगितलं आणि मग खरी गम्मत सुरू झाली. प्रोसेस सुरू झाली. यापूर्वी कोकण पाहिलेली, अनुभवलेली आम्ही तिघं -चौघंच होतो. माझं घर महाडला आहे आणि आजोळ रत्नागिरीला ! त्यामुळे मी बऱ्यापैकी परिचित होते, कोकणची माती, माणसं, निसर्ग यांच्याशी.




पण..........तरीही वसुधा करणं सहजासहजी जमेना! म्हणजे असं समंजस, सोज्ज्वळ, शांत वगैरे!!!!!!! घरात एवढे प्रोब्लेम्स असतानाही हसतमुख राहायचं ........बापरे !मला तर सुरुवातीला हसतमुख राहायला जमायचंच नाही. तिथपासून सुरुवात!




आणि शिवाय दोन मुलींची आई असणं! त्यांच्याशी मायेने वागणं वगैरे......................................


पहिल्याच इम्प्रो मध्ये, '' सायलीला (मीनाला) कसलंतरी टेन्शन आलं आहे आणि ते ती तुला सांगेल '' असं ब्रीफ दादाने आम्हाला दिलंन. इम्प्रो सुरू झालं. सायली मला सांगू लागली. मी तिला थोपटू लागले. तिच्या डोक्यावर तेल घातलं तरी ती आपली कुरकुर करतच होती. मग मी हळूच तिच्या कानात तेल घातलं तर तिला खरंच गुदगुल्या व्हायला लागल्या कानात! मग आम्ही खूप हसलो. तेव्हा जे काही नातं तयार झालं आमच्यात, ते आजही आम्ही भेटलो की लग्गेच ''पाक'' करायला लागतो !



खूप छान प्रोसेस केली आम्ही! चित्रं काढली, पत्रं लिहिली, मोगरयाचे गजरे , चाफ्याची फुलं, रोज आणायचो. रोज तालमीच्या इथे आले की तिन्हीसांजेला लावतात तशी उदबत्ती लावायचे. मग रामरक्षा म्हणायचो.




प्रोसेस ची सुरुवात आम्ही प्रदीप दादाच्या घरी कुळथाच पिठलं आणि भात असा बेत करून केली होती.




दादाने प्रत्येकाला एक एक गाणं दिलं होतं. माझं गाणं होतं ''केळीचे सुकले बाग''!


नाटकात ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत असे नुसते उल्लेख येतात,त्या जवळ जवळ सर्व गोष्टींवर आम्ही इम्प्रोज केली आहेत. त्याचा खूप उपयोग झाला आम्हाला! आन्जर्ल्याची ट्रीप खूप महत्वाची ठरली यामध्ये.


''सहस्रचंद्रदर्शन''हे नाटक नाही तर एक जाणीव आहे आमच्या सगळ्यांचीच! आता ते वेगळं नाही होऊ शकत आमच्यापासून!




नारळाची झावळी, त्यातून दिसणारा चंद्र ... अथांग समुद्र .. आंब्याची कलमं, माडांच्या बागा, सोनचाफ्याचा सुगंध, सारवलेलं अंगण, ओटीवरचा झोपाळा, माजघरातील उब, आजीचे मऊमऊ हात, तिची मायेची पाखर, आजीची गोधडी, देवघर, उदबत्तीचा - धूपाचा वास, चुलीवरच कुळथाचं पिठलं ,भात, उकडीचे मोदक, माणसं, त्यांचे हेवेदावे, प्रेम, ओढ ... या आणि अश्या हज्जार गोष्टी !!!!!!!!!!!! यांचच बनलं आहे............................. ''सहस्र''चंद्रदर्शन !!

''प्रतिभा''ची स्टोरी ...




Hi, I was Pratibha in the play। I was going to write in Marathi and hence was taking the time to write it. But English seems to be coming to me more naturally these days. So, here goes.

I feel Sahasrachandradarshan, more than anything is a fantastic introspection into the subconscious. Not because of the story itself but because how Pradeep chose to direct it. It was based on the philosophy that when two people genuinely interact, there is drama created automatically. Hence, in order for two characters to genuinely interact, it was necessary that each character delves into their subconscious, and thereby come closer to the character they are playing.

I feel this had to be a fantastic exercise, although I wish I were more a part of it.

I came quite later into the picture. And just like the placebo effect of a medicine works on your psychology more than your physiology, the effect of the play is profound. My coming to Pune from Toronto, just in time for this play in itself is an amazing coincidence. There have been many such "coincidences" throughout this process for other people in the play as well and I strongly feel that it is the subconscious at work.

This play is not only a theatrical achievement, but also an important experiment in psychology.

It was an important part of my life and I was trying to discover myself all over again in real life. I feel the same was true with the character Pratibha. Because Pratibha had been away from her home in Konkan for such a long time, she is now trying to make things better by arranging for a grand ceremony of her mother's 81st birthday.

She is trying not to feel guilty of what she had done to the family when she ran away from home. She is trying to come to terms with her present and with the contradiction of life-style it creates with her past.

I had a hard time in the beginning trying to relate to each character in the play. I was very nervous about being on stage after such a long gap. I had lost the ability to be myself in front of strangers. I had grown too conscious of my physical presence. I couldn't relate to the mother in the play at all.

So, Pradeep asked me to make a list of items I would bring for my mother as gifts. And that started a whole series of thought process for me. I built stories around each object from Pratibha's childhood. This was a very memorable exercise for me and helped me a lot during performance.

It was an important milestone for my self-discovery personally as well as character wise. I will never forget my days with the Sahasrachandradarshan team.

Thursday, June 25, 2009

मी चिनू


Hi!


मी चिनू (म्हणजे श्वेताचा पुण्यातला मित्र जो कि सर्पमित्र पण आहे). सहस्र मध्ये मी चिनूची भूमिका करतो. सहस्र बद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, सहस्रच्या खूप आठवणी, किस्से आहेत सांगण्यासारखे. सहस्रच्या process च्या दरम्यान मला खूप काही मिळालं, खूप मज्जा केली आम्ही सगळ्यांनी ह्या process दरम्यान. आणि एक की सहस्र हे माझं सगळ्यात आवडत नाटक आहे आणि आम्ही ते पुन्हा करणार आहोत म्हणून भारी वाटतंय. अगदी सुरवातीपासून आम्ही सहस्रसाठी खूपच process केली आणि त्याचा आम्हा सर्वांना खूप फायदा झाला.


मला आठवतय की मला आणि श्वेताला (अमृता वाणी) अगदी सुरवातीला जेव्हा आम्ही सगळेजण आपआपल्या सीनसाठी काम करत होतो तेव्हा दादानी मला आणि अमृताला process चा एक भाग म्हणून एक exercise सांगितला होता. त्याने मला आणि अमृताला माझ्या गाडीवरून फिरून यायला सांगितलं होतं. म्हणून मी आणि अमृता निघालो. त्यावेळी आम्ही गुप्ते मंगलला तालीम करत होतो. तर गुप्ते पासून थोड्या अंतरावर गेलो आणि अमृता म्हणाली की तिला मला काही तरी सांगायचं आहे, मग मी म्हणालो की मग सांग की... पण ती काहीच बोलत नव्हती .. मग जरा वेळानी परत म्हणाली कि मला तुला काहीतरी सांगायचंय आणि परत गप्प बसली. माझी चिडचिड व्हायला लागली होती. ती नुसतंच सांगायची की मला तुला काहीतरी सांगायचंय पण काहीच बोलत नव्हती. असा बराच वेळ गेला आणि नंतर माझी जरा जास्तीच चिडचिड व्हयला लागली, मी चिडून ओरडून तिला पुन्हा विचारलं पण ती काहीच बोलत नव्हती. मला एकदा वाटला पण होत की सरळ गाडी रस्त्याच्या कडेला घ्यावी आणि विचरावं .. कारण मी ओरडून तिला विचारत असताना सिग्नलला सगळे आमच्याकडे बघत होते आणि त्यामुळे मला जरा जास्तीच राग आला होता . पण आता आम्ही फिरून गुप्तेच्या जवळ आलो होतो पण ती काहीच बोलली नव्हती. शेवटी गाडी लावताना ती म्हणाली की गाडी पार्क कर मी सांगते. मी गाडी पार्क करायला गेलो पण तिथे पण माझी चीडचीड झाली, लौकर जागाच मिळत नव्हती. शेवटी एकदाची गाडी पार्क केली आणि परत आलो तर अमृता वर निघून गेली होती. आता तर जास्तीच सटकलं माझं डोकं ! मी पण तावातावानी वरती गेलो. मी दादाला सांगणार होतो तेवढ्यात त्याने आम्हाला सीन करायला सांगितला..... आणि त्या दिवशी आमचा सीन खूपच चांगला झाला. मला खूप बर वाटलं.



त्यानंतर अनेकदा process चा भाग म्हणून मी आणि अमृता खडकवासल्याला, भूगाव लेक इथे गेलो. नाटकात आमचा सीन हा नदीकाठी घडतो म्हणून नदीकाठचा फील यावा, पाण्याचा आवाज, दगड, झाडं, पक्षी, पाण्यात दगड मारल्यानंतर येणारा आवाज या सगळ्या गोष्टी त्यामुळे अनुभवायला मिळाल्या.



माझ्यासाठी म्हणून दादानी मला आणि अमृताला सर्पोद्यानातपण जायला सांगितलं होत, खूप मज्जा आली त्यावेळी.


process चाच एक भाग म्हणून आम्ही रोज चित्र पण काढत होतो, दादा कधीकधी आम्हाला writing exercise पण सांगायचा त्याचाही आम्हाला खूप फायदा झाला !



आमचं नाटक हे मुळातच कोकणातलं , आणि आमच्यात अनेक जणांनी कोकण नीट पाहिलं नव्हतं. म्हणजे तिथले लोक कसे राहतात, त्यांचं daily routine कसं असतं, तिथली लोकं कोणती कोणती कामं करतात ह्याची माहिती होण्यासाठी आम्ही एकदा कोकणात आंजर्लेला गेलो होतो. तिथे तर खूप मज्जा केली आम्ही. दादानी प्रत्येकाला त्याच्या character नुसार काही ना काहीतरी exercise दिले होते. प्रत्येकाला character नुसार specific वास, आवाज, काही कामं, फुलं etc.. सांगितलं होत. मला त्याने tourist म्हणून फिरायला सांगितलं होतं. वेगवेगळे पक्षी, फुलं, झाडं etc बघायला सांगितलं होतं. तिथे आम्ही सगळेजण नाटकातल्याप्रमाणे वागत होतो, आणि खरंच मला त्या दिवसात मी दीक्षित कुटुंबात आल्यासारखा वाटत होतं . आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे त्या संपूर्ण ट्रीप मध्ये मलाच फक्त साप दिसले, बाकी कोणालापण नाही.



कोकणात आम्ही सगळ्यांनी आपले सीन त्या त्या locations वर जाऊन केले, खूप मज्जा आली. मला आणि अमृताला आम्ही ज्या घरात राहिलो होतो त्या घराच्या मागच्या बाजूला एक पायवाट होती जी की डोंगरावर गणपतीच्या देवळात जात होती .. त्या ठिकाणी सीन करताना एक पाण्याचा एक ओहोळ वाहत होता त्याचा इतका छान आवाज येत होता की बास् ... खूप छान वाटत होतं ...


कोकणात जाऊन आल्यावर तिथली झाडं, फुलं ह्या सगळ्याचा आमच्या performance वर खूप छान effect झाला !

Tuesday, June 23, 2009

कोकणातल्या ''दीपा''कडचा प्रवास






मी संयोगिता,म्हणजे सहस्र मधली दीपा दीक्षित. नाटकातल्या दिक्षितांच शेंडेफळ.




साधारण जुलै ऑगस्ट मध्ये मला कळलं की मी या नाटकात दीपा आहे. खरं सांगायचं तर मी तेव्हा शहरातली दीपा होते म्हणजे पुण्यातली. मग माझा कोकणातल्या दीपाकडचा प्रवास सुरु झाला. हा प्रवास फार सुंदर होता. त्यात फक्त मी नव्हते तर माझ्याबरोबर माझं सगळं दीक्षित कुटुंब होतं. एकमेकांना नीट समजून घेण्यासाठी, एकमेकांबरोबर घरच्यांसारख मोकळं आणि सहज वागण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून खूप इंटरेस्टिंग प्रोसेस केली. त्यात आम्ही खूप improvisations केली.




प्रदीप दादाने (आमचा डिरेक्टर) आम्हाला काही विशिष्ट गोष्टी ज्यांचा वास, रंग, आवाज, चव, स्पर्श etc character ला उपयोगी पडतील अशा काही गोष्टी सांगितल्या eg माझ्यासाठी आंब्याचा मोरंबा, घंटेची किणकिण, मधुमालतीची फुलं etc.




सगळ्यात धमाल म्हणजे आम्ही सगळे कोकण , तिथली लोकं समजून घ्यायला गेलो .तिथे आम्हाला फार वेगवेगळे अनुभव आले जे पुढे actual shows च्या वेळी खूप महत्वाचे ठरले. ती ट्रीप माझा आयुष्यातली अविस्मरणीय ट्रीप होती.


'सहस्र.. ' मुळे मला खूप चांगले, खूप जवळचे मित्र-मैत्रिणी मिळाले....आमच्या सगळ्यान्मधेच अगदी घट्ट bonding झालं ....




सहस्र हे माझं आत्तापर्यन्तचं सगळ्यात आवडतं नाटक आहे. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ते आता पुन्हा सदर करतोय !!

यश

सहस्रचंद्रदर्शन या नाटकाचे यश ....

२००७ ... ४७ वी राज्य नाट्य स्पर्धा : प्राथमिक फेरी : पुणे विभाग

सांघिक प्रथम क्रमांक - पुणे विभाग
दिग्दर्शन - द्वितीय (प्रदीप वैद्य)
नेपथ्य - प्रथम (प्रदीप वैद्य)
पार्श्व-संगीत - प्रथम (प्रदीप वैद्य)
प्रकाशयोजना - प्रथम (निरंजन गोखले)
अभिनय प्रशस्तीपत्रे - गीतांजली जोशी (शांता), संयोगिता पेंडसे (दीपा), हर्षद राजपाठक (गणेश), आशिष वझे (आप्पा)

अंतिम फेरी : मुंबई येथे

सांघिक तृतीय क्रमांक
दिग्दर्शन : तृतीय (प्रदीप वैद्य)
नेपथ्य : प्रथम (प्रदीप वैद्य)
पार्श्व-संगीत : प्रथम (प्रदीप वैद्य)
प्रकाश योजना : द्वितीय (निरंजन गोखले)
लेखन : तृतीय (प्रदीप वैद्य)
अभिनय : रौप्य-पदके : गीतांजली जोशी (शांता) , आशीष वझे (आप्पा)
अभिनय प्रशस्तिपत्र : मिनाक्षी शिदोरे (वसुधा)

नाट्य परिषद् पुणे शाखेने दिलेले पुरस्कार :

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक २००७ : वाळवेकर पुरस्कार
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (प्रायोगिक नाटक : २००७) कै. भालबा केळकर पुरस्कार : प्रदीप वैद्य (''सहस्रचंद्रदर्शन''करिता)

Friday, June 19, 2009

आमची कोकण ट्रीप ...







सहस्रचंद्रदर्शन.... या नाटकात मी श्वेता आहे. या नाटकादरम्यान आम्ही खूप वेगवेगळी process केली आहे पण मला आत्ता प्रामुख्याने या process बद्दल लिहावसं वाटतं... म्हणजे आमची कोकण ट्रीप. आमच्यातल्या फार कमी जणांना कोकण नीट माहित होतं. म्हणून आम्ही कोकणात गेलो. ..... आंजर्लेला.... आमच्यातल्या एका मुलाच्या बहिणीचं तिथे घर आहे. ती मुंबईला राहते. घर रिकामं होतं. काही लोक हे आदल्या दिवशी गेले आणि काही नंतर. आधी जे गेले होते त्यांनी उरलेल्यांचं स्वागत अगदी कोकणातल्या लोकांसारखं केलं. दीपा आणि वसुधाने घरासमोर रांगोळी काढली होती. आल्यावर सगळ्यांचे पाय धुतले. वसुधा आणि शांताने गूळपोहे केले होते. तिथे आम्ही नाटकातली पात्र म्हणूनच रहात होतो. चुलीवर पाणी तापवत होतो.


नाटकात जे घराबाहेरचे scene होते ते आम्ही तशी locations शाधून तिथे केले . प्रत्यक्ष त्या जागी जाऊन scene करणं हे फार वेगळं असतं. तिथल्या निसर्गाचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, माती, दगड, पाण्याचा आवाज, वातावरण सगळंच वेगळं होतं. त्यामुळे वेगळंच जाणवत होतं.. या सगळ्या गोष्टी scene मध्ये काही ना काहीतरी contribute करत होत्या . ते scene नेहमीपेक्षा फार वेगळे होत होते.


रात्री आम्ही कुळथाचं पिठलं केलं, चुलीवर भात केला, चुलीत कांदे भाजले. त्या सगळ्याची खूप मस्तं चव होती. जेवायच्या आधी रामरक्षा म्हटली. मग जेवताना प्रदीपदादाने त्या पुढे process चा भाग म्हणून .. प्रत्येकाला character नुसार वेगवेगळे वास, स्पर्श, आवाज, त्या वस्तूचं दिसणं हे लक्षात ठेवायला सांगितलं. उदा.: मला धबधब्याचा किंवा जोरात पडणाऱ्या पाण्याचा आवाज, केवडा, चंदन.


कोकणातलं घर पाहिल्यामुळे वाडी, माजघर, माडी, पडवी म्हणजे काय हे नीट कळलं. नाटक करताना ते सर्व डोळ्यासमोर येत गेलं. तिथली माणसं, तिथला समुद्र, समुद्राचा आवाज, झाडी, देऊळ, डोंगर, तिथली शांतता सगळंच वेगळं आणि अविस्मरणीय आहे.


या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीचा परिणाम आमच्या performance वर होत गेला.


ही trip आम्ही कधीच विसरू शकत नाही.

Thursday, June 18, 2009

पत्रिकेची गम्मत :


माझे वडिल कुण्डली वगैरे बघत असत .. त्या मधूनच मीही काही काळ त्या प्रकारात रस घेत गेलो होतो आणि मग माझ्या सवयीप्रमाणे त्या विषयात खोल गेलोही होतो. आता मी कुंडली पाहाण्याचे बरेचसे नियम वगैरे जाणतो पण त्या सगळ्यातला फोलपणाही माझ्या तेव्हाच एकीकडे लक्षात येत गेल्याने आता मनोरंजन या एक प्रकारात कुंडली भविष्य बघणे हे प्रकार जाऊन बसले आहेत. मग कधीतरी नाटकाच्या दौऱ्यावर नाटकातल्या मित्रांना गम्मत म्हणून जागरण करत भविष्य सांग, कधी एखाद्या मित्र-मैत्रिणीच्या एखाद्या कामाबद्दल ''bet'' लाव असे प्रकार माझे चालू असतात अधून-मधून, पण मी कुंडली हा प्रकार seriously अजिबातच घेत नाही ...


सहस्रचंद्रदर्शन या नाटकाच्या बाबतीत एक मजा ( ... म्हणजे जेव्हा ती झाली तेव्हा तोंडचं पाणी पळायची वेळ आली होती .. पण सर्व काही होऊन गेलं की आपण मजा वगैरे शांतपणे म्हणतो ना, तसा म्हणतोय मी ..) तर मजा झाली होती ती अशी की खूप दिवस आम्ही तालमी करत होतो पण आजीचा पत्ताच नव्हता ... शेवटी गीतांजली जोशी, जी तेव्हा शांताचं काम करत होती, तिने सुचवलेल्या 'स्वप्ना दातार'ला मी भेटलो. स्वप्ना याबद्दल excited होती पण तिलाही काही समस्या होत्याच .. असो .. तर ते सर्व गणित बसल्यावर ती काम करायला येऊ लागली .. ही इतर सर्व नट-मंडळी बरेच दिवस आप-आपल्या पात्राच्या दिशेने काम करत होती पण आजीला वेळ खूप कमी मिळाला होता .. तिला तिच्या पात्राच्या जवळ नेण्याच्या दृष्टीने काय काय करता येईल याचा मी सर्वतोपरी विचार करत बसे ...

एक दिवस मला अचानक काहीतरी डोक्यात आलं .. मी २००६ च्या आधीच्या चार-पांच वर्षांची काल-निर्णय कैलेंडर्स घेऊन बसलो .. मला आजीला असं काहीतरी द्यायचं होतं की जे तिला तिच्याबद्दल जास्त माहिती अथवा काहीतरी विशेष पुरवेल .. काय द्यावं ? काय असेल ते जे एका आजीला देता येईल ? या प्रश्ना-प्रश्नांमधून मला काहीतरी सुचलं होतं ...

सहस्र... घडण्याचा अंदाजे काळ आम्ही ठरवला होता २००३-२००५ च्या आसपास .. तर सहस्रचंद्रदर्शन होण्यासाठी आवश्यक परिस्थिती म्हणजे .. नाटकात असलेले सर्व सन्दर्भ लक्षात घेता .. मे महिन्यात ३-४ तारखेच्या आस-पास पौर्णिमा असणे आवश्यक होतं .. तर ते मला २००४ साली असल्याचं लक्षात आलं .. म्हणजे २००४ साली ४ मे ला पौर्णिमा होती हे !

मग माझा हा एक विशेष उद्योग सुरु झाला. आजीचं माहेर दापोली परिसरात आहे हे माझ्या मनाने नाटक लिहितानाच ठरवलं होतंच .. तो सन्दर्भ इथे .. या उद्योगात महत्वाचा होता .. मी आजीच्या वयाचा ४ मे २००४ ला ८१ वर्षं (तर हां वाढदिवस तिथिप्रमाणे असेल अश्या रितीने हा सन्दर्भ वापरून) जन्म-साल आणि महिना ठरवला आणि जन्म ठिकाण तर माहितच होतं .. आजीचं माहेरचं नावही नाटकाच्या एक खर्ड्यात मी मागे लिहून ठेवलं होतंच ... झालं .. ही सर्व माहिती मिळवून-जुळवून मी आजीची एक पूर्ण पत्रिका तयार करून घेतली ...

एका नामवंत ज्योतिष्याला ती पाहायला दिली आणि एक जुन्या पद्धतीचं सविस्तर जन्म-टिपण तयार करून घेऊन ते आजीच्या हातात ठेवलं ...

आता जे मी सांगणार आहे ते ज्योतिष्यावर विश्वास ठेवा असं सांगायला नक्कीच नाही .. कारण मीच तो ठेवत नाही .. पण interesting गम्मत अशी की या तयार केलेल्या टिपणाप्रमाणे .. ती जी कोणी आजी असेल .. म्हणजे दापोलीला जन्म झालाय अशी कल्पना करून मी जिची कुंडली तयार करून घेतली होती .. ती आजी .. तिच्या आयुष्यात त्या ज्योतिष्य-वेत्त्याच्या भाकितानुसार पुनर्विवाह, दुसऱ्या पतीपासून सन्मानाची वागणूक आणि अपत्य-प्राप्ती, त्यात मुलींची संख्या जास्त, अनेक चढ़-उतार, उतार वयात मुलांकडून दुर्लक्ष, एखाद्या समारम्भात मृत्यू असे योग होते ..

आमच्या हातात जेव्हा हे टिपण आलं .. तेव्हा .. मी आणि स्मिता ( तिच्या शेजारी राहणारे हे ज्योतिषी होते .. त्यामुळे ती ते टिपण घेऊन आली होती ना !) आम्ही दोघं अचंबित झालो .. मला क्षणभर कळेचना की काय आहे हे सर्व ... ?

पण जणू काही कोकणातल्या एखाद्या गांवात एखादी खरी आजी असावी आणि तिची कुंडली तिच्या नातेवाईकांनी करून घ्यावी तसं हे सर्व वाटत होतं हे मात्र खरं .... !!






सहस्रचन्द्रदर्शन मधली माझी एक आठवण ...


सहस्रचन्द्रदर्शन मधे मी ताईची भूमिका करते. ह्या नाटकांत मला जरी फार आव्हानात्मक भूमिका नसली, तरी नाटकाची कथा, त्यातली पात्रं आणि त्यातले कलाकार, ह्यामुळे मला मजा येणार हे माहित होतं. ह्या नाटकाची process करताना मला स्वत:मधल्या अनेक गोष्टींचा पुन्हा प्रत्यय आला.

नाटकाच्या तालमी सुरु झाल्या तेंव्हा प्रदीप म्हणाला की आपण लगेच script वर काम सुरु न करता आधी त्या सर्वं पात्रांच्या आयुष्याबद्दलच्या आणि त्यांच्या एकेमेकांशी असलेल्या नात्यांबद्दलच्या back stories ची improvisations करणार आहोत.

पहिल्या एक-दोन improvisations च्या वेळेची ही आठवण. एक improvisation चालू असताना अचानक मला समजलं की माझा डोक्याने थोडा अधू भाचा गणा, म्हणजे गणेश, माझ्या मुलीला एकदा रात्री काहीतरी odd मिठी मारतो. मी इतकी प्रचंड संतापले ! संतापाने मला जे रडू आलं ते नंतर त्या improvisation बद्दलची चर्चा संपली तरी आवरंत नव्हतं. त्या वेळी सचिन ने गणा ची भूमिका केली होती. मला कितीतरी वेळ त्याच्याकडे बघता सुद्धा येत नव्हतं. एकीकडे हे समजत होतं की सचिन आणि गणा वेगळे आहेत, पण तरी त्या दिवशी त्यानंतर मला त्याच्याकडे रागाशिवाय इतर कुठल्या भावनेने पहाताच येत नव्हतं.

त्यानंतर अनेक दिवसांनी एका improvisation मधे एक गडी माझ्या मुलीला, श्वेताला, ती लहान असताना भुताची गोष्टं सांगून घाबरवतो. ती खूप रडते. हे सगळं wing मधे होतं आणि मी चिडून घरात येते अशी माझी entry होती. तरी मला इतका राग आला होता की शांत व्हायला जरा वेळंच लागला.

माझ्या लोकांना अगदी इतकासा सुद्धा त्रास कोणी दिला कि मी disproportionately चवताळते ह्याचा प्रत्यय मलाच नाही तर माझ्या सहकलाकारांनाही आला :)

- रुपाली भावे (सहस्रचंद्रदर्शन मधली ''ताई'')

Friday, June 12, 2009

जन्म ...


मी नाट्यक्षेत्रात गेली अनेक वर्ष विविध स्वरूपाचं काम करतोय .. म्हणजे .. Lights, Music, Lekhan … विविध ! दिग्दर्शन करावं असं मला अगदी अलिकडेच वाटू लागलं . आणि ते ही मी करायला घेतल्यावर पाहिले एक-दोन अनुभव ज़रा खट्टू करणारेच निघाले .. तरीही मनात जी इच्छा तग धरून राहिली होती ती पुन्हा डोकं वर काढू लागली आणि सहस्रचन्द्रदर्शन या नाटकाचा जन्म झाला !

माझ्या या प्रवासात हातात हात घालूनच सहस्र .. च्या लेखनाचा प्रवास होत गेला ...

माझ्या एक नातेवाईकांच्या साठी-शांति निमित्त मी एखादं गाणं म्हणावं असं ठरलं होतं म्हणून मी त्या हॉल वर गेलो होतो .. समारंभ, त्यातलं ते उत्सवी वातावरण आलंच ... त्या सगळ्यात एक विचित्र गोष्ट घडली ...

मी गायला उभा राहिलो आणि त्या उत्सवमूर्तींना 'food poisoning' मुळे जबर उलट्या सुरु झाल्या होत्या आणि त्यातूनच त्यांना ग्लानी येऊ लागली. पण हा समारंभ परदेशातून आलेल्या आणखी एका नातेवाईकांच्या पुढाकाराने चाललेला असल्याने नक्की कोणाच्या आनंदाकड़े पाहायचं ?
नि गायचं की थांबायचं ? असे विषय तिथे चर्चेला आले ..
म्हणजे मला गावं असं वाटेनासं झालं ..

.. पण त्यामुळेच तिथे या चर्चा सुरु झाल्या

.. नि हा विषय माझ्या डोक्यात सुरु झाला ....

पुढे एकदा तू नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी मी एका कवितेत नेहेमी करतो तसा चंद्राचं दृश्य उभं केलं आणि त्या चंद्राखाली .. चक्क ती कविता एकीकडे चालू असतानाच .. एक आजी आणि एक नाट गप्पा मारताना मला दिसल्या .. अगदी क्षणभर .. मग हळूहळू पुढे केव्हातरी त्या आजीची सर्व कथा आकाराला येत गेली .. अर्थातच माझ्या मनातच ..


मला मुलात सुचलेल्या नाटकात आजीला तिच्या सहस्रचंद्रदर्शनाआधी चार दिवस
'paraplegia' झाला आहे असं सुचलं होतं ... आणि पहिल्या अंकाच्या शेवटी अगदी मोक्याच्या वेळी ती निधन पावते असं सुचलं होतं ... मी ते लिहिलं आणि मोहितला वाचून दाखवलं .. तो काही फारसा मोहात पडलेला वाटला नाही .. मग एक वर्ष गेलं जेव्हा हे स्क्रिप्ट पदूनाच राहिलं ... नंतर मी ते चेतन दातारला वाचायला दिलं ... त्याने नुकतंच 'वाडा' केलं होतं .. माझं नाटक वाडाप्रमाणेच होतं आहे का ते मला पाहायचं होतंच .. पण चेतनची प्रतिक्रिया वेगळीच निघाली ... ती उत्साहवर्धक होती !


त्याने मला तेव्हा जी एक दिशा दिली त्यामुले आज जे नाटक सादर होताना दिसतं ते तसं साध्य झालं. त्याने दिलेल्या या दिशेवर माझ्या या (त्याच्या शब्दात चांगल्या चितारलेल्या किंवा दिसू लागलेल्या ) यातल्या प्रत्येक पात्रासोबत राहाताना हे नाटक आकार घेत गेलं ... ती खरी हाडामांसाची माणसं मिळावीत हे खरं आणि मुख्य काम होतं आणि ते पुढेपुढे योग्य प्रमाणात सफल झालं ...
साधारण आकार-प्रकार माहीत असलेल्या या माणसांच्याबाबत, ''त्यांच्या आयुष्यात कधी काय घडत गेलं असेल नि कसं? '' त्याचा शोध मी माझ्या कलाकारांसोबत घेऊ लागलो .. पस्तीस वेगवेगळे प्रसंग जे या नाटकातमुळी नाहीतच ते आम्ही करुन पाहिले .. प्रत्येकजण त्या त्या प्रसंगामाधे आप-आपल्या स्वभावातून वागायचा प्रयत्न करत राहिला .. .. मनातल्या मनात एका अंधारात आम्ही सगळे फिरत होतो .. .. चाचपडत ज्याला त्याला आपापल्या भूमिकेच्या ... म्हणजे नाटकातल्या आपापल्या वर्णनाच्या व्यक्तीचं बोट हवं होतं .. ते हाती लागलं की प्रत्येकजण त्या जगात मस्त फिरणार होतं ... आणि सापडत गेली .. माणसं प्रत्येकालाच ... खरी माणसं .. खरे विकार ... खरे प्रसंग ...

या सगळ्यातच मी लिहीतही होतो .... ते ही आकार घेत गेलं आणि एक नाटक आकाराला आलं ... दोन अंकातलं ... सहस्रचंद्रदर्शन !

Wednesday, June 10, 2009

सहस्रचंद्रदर्शन

पी डी ए च्या नव्या पीढिच्या गेल्या तीन वर्ष चालू असलेल्या कामामधे सहस्रचंद्रदर्शन या दोन अंकी नाटकाला अनन्यसाधारण महत्व आहे. पूर्णपणे नव्या जाणिवा घेऊन उभी राहिलेली पी डी ए ची नवी पीढी हे दोन अंकी नाटक समर्थपणे सादर करते ... या नाटकाविषयी सर्वकाही या इथे .... या ब्लॉग वर ....